
Shodh Nehruncha ani Bharatachahi by Shashi Tharoor
जवाहरलाल नेहरू... देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलं. आयुष्याची तीस वर्षं ते इंग्रजांशी झगडत राहिले. त्यातील जवळपास नऊ वर्षं त्यांनी कारावास भोगला.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. सलग सतरा वर्षं. देशाच्या विकासाची दृष्टी त्यांनी विकसित केली. जनतेत आत्मविश्वास आणि परदेशांत ओळख निर्माण केली.
नेहरूंची कारकीर्द संपून आता अर्धशतक लोटलं आहे. त्यांच्या विचारांचा देशावर अजूनही प्रभाव असला, तरी वारसा फारच थोडा शिल्लक आहे. शिवाय अनेक बाबतींत ते टीकेचे धनीही बनत आहेत.
एका लढवय्या आणि कर्तबगार लोकनेत्याच्या आयुष्याची कहाणी ही अशी आहे. शशी थरूर यांनी लिहिलेलं हे चरित्र या कहाणीचे ताणेबाणे उकलून दाखवतं, नेहरूंच्या योगदानाची तटस्थ चर्चा करतं आणि नेहरूंविषयीच्या समज-गैरसमजाचं निरसन करतं. नेहरूंकडे पन्नास वर्षांनंतर कसं पाहायचं हे सांगतं.
आजच्या पिढीसाठी 'मस्ट रीड' पुस्तक.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. सलग सतरा वर्षं. देशाच्या विकासाची दृष्टी त्यांनी विकसित केली. जनतेत आत्मविश्वास आणि परदेशांत ओळख निर्माण केली.
नेहरूंची कारकीर्द संपून आता अर्धशतक लोटलं आहे. त्यांच्या विचारांचा देशावर अजूनही प्रभाव असला, तरी वारसा फारच थोडा शिल्लक आहे. शिवाय अनेक बाबतींत ते टीकेचे धनीही बनत आहेत.
एका लढवय्या आणि कर्तबगार लोकनेत्याच्या आयुष्याची कहाणी ही अशी आहे. शशी थरूर यांनी लिहिलेलं हे चरित्र या कहाणीचे ताणेबाणे उकलून दाखवतं, नेहरूंच्या योगदानाची तटस्थ चर्चा करतं आणि नेहरूंविषयीच्या समज-गैरसमजाचं निरसन करतं. नेहरूंकडे पन्नास वर्षांनंतर कसं पाहायचं हे सांगतं.
आजच्या पिढीसाठी 'मस्ट रीड' पुस्तक.