
Sanket by Ranjit Desai
आटपाडीच्या हंबीरराव मोहित्यांचा एकुलत्या एका मुलानं ‘यशाचं कडं’ जिंकलं; ‘बदली’ च्या गावी जाताना शंकर मास्तरांना रामूच्या पत्रानं दिलासा दिला; दोन दिवस उपाशी असणार्या गाईच्या ‘आंबवण’ साठी द्रौपदीनं जीवाचं रान केलं; ‘हंगाम’ गाठण्यासाठी जीवाचा आटापीटा करणार्या भरमूचं तान्हं पोर मात्र तापानं फणफणलं होतं; बुढ्या ‘पाशा’ने पैजेसाठी सवाई पाश्याशी कडवी झुंज दिली; महेंद्राच्या पाठीमागून माद्या पैलतीराकडे निघाल्या, तेव्हा ‘हस्ता’च्या पावसाच्या उभ्या सरी कोसळत होत्या; ह्या अनर्थाला तोच मानव कारणीभूत आहे, हे ओळखून वाघाने त्याचा ‘सूड’ घेतला; ...ह्या घडणार्या प्रत्येक घटना जणू एक अघटित ‘संकेत’च घेऊन जन्माला आल्या होत्या!