
Ranabakhar by Milind Thatte
आदिवासी म्हणजे रानातले राजे आशीच आजवरची रूढ प्रतिमा. पण गेल्या पंचवीस - तीस वर्षात आदिवासींच्या जगण्याचे अनेक कंगोरे समोर येत आहेत. त्यात कुपोषणापासून विस्थापनापर्यंत आणि स्वशासनापासून ते नक्षलवादापर्यंत अनेक बाबी आहेत. मग आदिवासींच हे आजचं जगणं कसं आहे?त्यांचे खरे प्रश्न काय आहेत? त्यांच्या कष्टमय जगण्याचा फास सुटावा, यासाठी काय प्रयत्न चालले आहेत? मायबाप सरकारच्या धोरणामुळे त्यांच्या जगण्यावर काय परिणाम होतो आहे? गेली दहा बारा वर्ष नाशिक-ठाणे-नंदुरबार या पट्ट्यातील आदिवासींसोबत त्यांच्यातलाच एक बनून राहिलेल्या आणि त्यांच्याच नजरेतून त्यांची सुख-दु:खं बघण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितलेली हि रानबखर